महाराष्ट्राचा भूगोल
महाराष्ट्र राज्य :
महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात २६ जिल्हे, २३५ तालुके, ४ प्रशासकीय विभाग होते. सध्यस्थितीला महाराष्ट्रात ३६ जिल्हे. ३५५ तालुके, ५३५ शहरे, ४३६६३ खेडी, ६ प्रशासकीय विभाग आहेत.
महाराष्ट्रातील ६ प्रशासकीय विभाग :
१. कोकण ( ३०७४६ चौ.कि.मी. ) मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे,पालघर, रायगड,रत्नागिरी/सिंधुदुर्ग.
२. पुणे/प.महाराष्ट्र ( ५७२६८ चौ.कि.मी. ) पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
३. नाशिक/खान्देश ( ५७४४२६ चौ.कि.मी. ) नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.
४. औरंगाबाद/मराठवाडा ( ६४८२२ चौ.कि.मी. ) औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली.उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
५. अमरावती/प. विदर्भ ( ४६०९० चौ.कि.मी. ) अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.
६. नागपूर/पूर्व विदर्भ ( ५१३३६ चौ.कि.मी. ) नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.
५. अमरावती/प. विदर्भ ( ४६०९० चौ.कि.मी. ) अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.
६. नागपूर/पूर्व विदर्भ ( ५१३३६ चौ.कि.मी. ) नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.
नैसर्गिक सीमा :
१. वायव्येस : सातंमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.
२. उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या.
३. ईशान्येस : दरेकासा टेकड्या.
४. पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.
५. दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.
६. पश्चिमेस : अरबी समुद्र.
राजकीय सीमा व सरहद्द :
५. दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.
६. पश्चिमेस : अरबी समुद्र.
राजकीय सीमा व सरहद्द :
१. वायव्येस : गुजरात व दादरा नगर हवेली.
२. उत्तरेस : मध्यप्रदेश.
३. पूर्वेस : छत्तीसगड.
४. आग्नेयेस: आंध्र प्रदेश.
५. दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.
राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे :
५. दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.
राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे :
१. गुजरात : पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे.
२. दादरा नगर हवेली : ठाणे, नाशिक.
२. दादरा नगर हवेली : ठाणे, नाशिक.
३. मध्यप्रदेश : नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा,अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया.
३. छत्तीसगड : गोंदिया, गडचिरोली.
४. आंध्र प्रदेश : गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड,
५. गोवा : सिंधुदुर्ग.
५. गोवा : सिंधुदुर्ग.
राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ९.१ % भाग कोकण च्या सखल प्रदेशाने व्यापला आहे. महाराष्ट्राची भूमी बेसाल्ट या प्रमुख अग्निजन्य खडकांनी बनलेली आहे . सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन किकन किनार पट्टी तैयार झाली आहे. महाराष्ट्राची भूमी प्रकुत्रिक दृष्ट्या एकसारखी आहे व खूप मोठे क्षेत्र पठारी आहे. दक्खन असे या पठाराचे नाव आहे.महाराष्ट्राचा पश्चिमेस आणि अरबी समुद्राला समांतर अश्या सह्याद्री पर्वत रांगा (पश्चिमघाट) आहेत.या पर्वत रांगा मधून गोदावरी,नर्मदा , आणि कृष्णे सह इतरही अनेक नद्या उगम पावतात.
अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वत रांगा मध्ये असलेल्या भागास “ कोकण” असे म्हणतात.राज्याच्या उत्तरेस ” सातपुडा “ तर पूर्वेस “ भामरागड-चिरोळी-गायखुरी “ पर्वत रांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो.महाराष्टातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडी साठी उपयुक्त आहे.
सह्याद्रीच्या पूर्वेस विस्तृत पठार आहे त्यास “ महाराष्ट पठार " असे म्हणतात. त्यास “ देश “ असेशी संबोधले जाते.
स्थान व विस्तार
महाराष्ट्र राज्य भारतीय द्विकाल्पाच्या पश्चिमेस आहे. त्याचा अक्षवृतीय विस्तार – १५ °-३५ ४६ उत्तर तर २२ -०२ १३ उत्तर अशी आहे तर रेखवृतीय विस्तार ७२ ३८ ४५ पूर्व ते ८० ५३ १७ पूर्व आहे.
राज्याचा सर्वसाधारण आकार त्रिकोणी आहे .महाराष्ट्राचे जास्तीत जास्त पूर्व –पश्चिम अंतर ८६० किमी आहे आणि दक्षिण –उत्तर अंतर ७३० किमी आहे.
एकूण जिल्हे- ३५
सर्वात मोठा जिल्हा – अहमदनगर.
सर्वात लहान जिल्हा- मुंबई.
जिल्हास्तरीय प्रशासनाच्या सोयीसाठी ३५ जिल्ह्याची ३५७ तालुक्यामध्ये विभागणी केली आहे.राज्यस्तरीय प्रशासनाच्या सोयी साठी कोकण,पुणे,नाशिक ,औरंगाबाद,अमरावती,आणि नागपूर असे ६ प्रशासकीय विभाग केले आहेत.
२०११ च्या जनगणने नुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या ११,२३,७२,७९२ इतकी असून ती एकूण ३७८ शहरे व ४१००० हून जास्त गावांत वितरीत झालेली आहे.
महाराष्ट्र चे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ- ३,०७,७१३ चौकिमी.
लागवडी खालील जमीन-५७.१७%
जंगलाखालील जमीन- २०.१०%
ओसाड जमीन-८.५७%.
कुरणे व झुडपे इ. खालील जमीन – ४.९६ %
निवळ पिकाखालील क्षेत्र- ५७.१०%
दुबार पेरणी क्षेत्र- ९%
ओलिताखालील जमीन- १७.७%
महाराष्ट्रा ने देशाचा एकूण ९.३६ % भाग व्यापला आहे.६.५% खेडी महाराष्ट्रत आहेत.
सह्याद्री माथ्यावर माथेरान ,महाबळेश्वर व आंबोली हि थंड हवेची ठिकाणे आहेत.घाटमाथ्यावर काही ठिकाणी ५०० सेमी पेक्षा जास्त पाऊस पडतो.
महाराष्ट्र चा रचनात्मक भूगोल व मुख्य विभाग.
१) कोकण किनारपट्टी-पश्चिमेस अरबी समुद्र आणि पूर्वेस पश्चिम घाट या निश्चित सीमा असणारा हा एक प्राकुत्रिक प्रदेश आहे.कमी उंची आणि पश्चिमे कढे उतार हि ह्याची वैशिष्ठे आहेत.
सह्याद्री किवा पश्चिम घाट.-कोकण व पठार या मध्ये “पश्चिम घाट “ हा भौगोलिक प्रदेश आहे.जास्त उंची आणि उंचसखलपणा यांवर आधारित महाराष्ट्र चा हा एक ठळकपणे उठन दिसणारा प्राकृतिक प्रदेश आहे.
२) पठारी प्रदेश-पश्चिम घाटाच्या पूर्वेस कमी उंची असलेला प्रदेश म्हणजे महाराष्ट्र चा पठारी प्रदेश होय.पठाराच्या उताराची दिशा याआधारे पठाराचे पुढील ३ स्वतंत्र विभाग पडतात.-
पश्चिम कढे उतार असणारे तापी नदीच्चे खोरे.
उत्तर –दक्षिण उतार असणारे वर्धा – वैनगंगा खोरे.
· पूर्वे कढे उतार असणारे उर्वरित पठार.
सह्याद्री किवा पश्चिम घाट
उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत सह्याद्री पसरलेला आहे.
एकूण लांबी-१६०० किमी
महाराष्ट्र मध्ये -४४० किमी.
सरासरी उंची -१२०० मीटर
पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्यांचा जलदुभाजक म्हणून सह्याद्री ओळखला जातो.या पर्वत रांगा ला कळसुबाई,साल्हेर व सप्तशृंगी सारखी शिखरे आहेत.ठलघात , बोरघाट,फोंडा घाट सारखे घाट आहेत.
महाराष्ट्र ची प्रमुख वैशिष्टे :
१) राज्यातील कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे (उंची १६४६ मी).
२) दखन पठारावर कापसाची काळी कसदार मृदा आढळते तिला “रेगुर “ म्हणतात.
३) आंबोली येथे राज्यातील सर्वाधिक पाऊस.
४) बुलढाणा जिल्ह्यातील “लोणार” हे उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर.
५) नागपूर : हि महाराष्ट्र ची उपराजधानी;आंबेडकर या महामानवाने बौद्ध धर्माचा स्वीकार या नागभूमितच केला.
६) महाराष्ट्र च निर्मिती १ मे १९६० (महाराष्ट्र दिन)
७) समुद्र किनाऱ्याची लांबी -७२० किमी.
८) ५ जानेवारी २००९ रोजी महाराष्ट्र तील औरंगाबाद या प्रशाशकीय विभागाचे विभाजन करून नांदेड या सातव्या प्रशाशकीय विभागाची घोषणा करण्यात आली.नव्या नांदेड विभागात नांदेड ,लातूर,परभणी,व हिंगोली या ४ जिल्ह्याचा समावेश होणार आहे.औरंगाबाद विभागातील जिल्ह्याची संख्या आता ८ ऐवजी ४ ( औरंगाबाद,जालना,बीड,उस्मानाबाद) इतकीच राहणार आहे.मात्र हा निर्णय वादग्रस्त ठरलेला असल्याने सातव्या प्रशाशकीय विभागाची अंमलबजावणी अद्याप झाली नाही.
No comments:
Post a Comment